मुंबईच्या भूजलात समुद्राचा शिरकाव
परिणामांच्या अभ्यासासाठी चेंबूर, गोरेगावात प्रकल्प
nitin.chavan@timesgroup.co
मुंबई मुंबईत विहिरींतील पाण्याचा टँकर लॉबीकडून बेसुमार उपसा होत असल्याने मुंबईचे अवघे भूजल धोक्यात आले असूनन समुद्राचे पाणी भूजलात शिरकाव करण्याचा धोका निर्माण झाला आहे. विहिरींच्या गोड्या पाण्यात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्यास मुंबईतील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना धक्का पोहचणार आहे. यामुळे महापालिकेने या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एका पर्यावरणवादी संस्थेच्या मदतीने चेंबूर आणि गोरगाव येथे पथदर्शी अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे.
विहिरी हा भूजलाचा नैसर्गिक स्रोत आहे. बिकट परिस्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विहिरी उपयोगी पडतात. आगीच्या ठिकाणी पोहोचण्याआधी अग्निशमन दलाला लांब जाऊन पाणी भरून घ्यावे लागते. आगीच्या जवळच्या भागात विहिरींचा शोध घ्यावा लागतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील विहिरी संरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र या नैसर्गिक स्रोतात समुद्राचे पाणी शिरकाव करण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा महापालिकेच्या यंदाच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात देण्यात आला आहे.
मुंबईत टँकर लॉबी दररोज लाखो लिटर पाणी पाण्याचा उपसा विहिरी व बोअर वेलमधून करते. या पार्श्वभूमीवर विहिरींतील भूजलाचा जास्त उपसा झाल्यास समुदाच्या पाण्याचा भूजलात शिरकाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईतील भूजल उपशाचा परिणाम अभ्यासण्यासाठी पालिकेने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे या संस्थेबरोबर एम-पूर्व आणि पी-दक्षिण या दोन विभागात एक अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे. पालिकेच्या रेन हार्वेस्टिंग कक्षाने कीटकनाशक अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील जुन्या खोदलेल्या विहिरी तसेच विंधण विहिरींची यादी बनवली आहे. विहिरींचे उपलब्ध भूगर्भाचे माहितीच्या आधारे संगणकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील भूजलाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी भूजलाच्या अतिउपशामुळे धोकादायक भूजल परिस्थिती झालेल्या विभागांची नोंद करण्यात येत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
जानेवारी २००३ पासून पालिकेने मुंबईतील अस्तित्वात असलेल्या विहिरी बुजवण्यास मनाई केली आहे. अनधिकृतपणे विहिरी बुजवल्यास इमारत आणि कारखाने विभागाच्या असिस्टंट इंजिनीअरमार्फत एमपीआरटीपी कायदा ५३ (१) अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sea-water-enters-in-mumbai-ground-water/articleshow/55947748.cms
परिणामांच्या अभ्यासासाठी चेंबूर, गोरेगावात प्रकल्प
nitin.chavan@timesgroup.co
मुंबई मुंबईत विहिरींतील पाण्याचा टँकर लॉबीकडून बेसुमार उपसा होत असल्याने मुंबईचे अवघे भूजल धोक्यात आले असूनन समुद्राचे पाणी भूजलात शिरकाव करण्याचा धोका निर्माण झाला आहे. विहिरींच्या गोड्या पाण्यात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्यास मुंबईतील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना धक्का पोहचणार आहे. यामुळे महापालिकेने या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एका पर्यावरणवादी संस्थेच्या मदतीने चेंबूर आणि गोरगाव येथे पथदर्शी अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे.
विहिरी हा भूजलाचा नैसर्गिक स्रोत आहे. बिकट परिस्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विहिरी उपयोगी पडतात. आगीच्या ठिकाणी पोहोचण्याआधी अग्निशमन दलाला लांब जाऊन पाणी भरून घ्यावे लागते. आगीच्या जवळच्या भागात विहिरींचा शोध घ्यावा लागतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील विहिरी संरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र या नैसर्गिक स्रोतात समुद्राचे पाणी शिरकाव करण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा महापालिकेच्या यंदाच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात देण्यात आला आहे.
मुंबईत टँकर लॉबी दररोज लाखो लिटर पाणी पाण्याचा उपसा विहिरी व बोअर वेलमधून करते. या पार्श्वभूमीवर विहिरींतील भूजलाचा जास्त उपसा झाल्यास समुदाच्या पाण्याचा भूजलात शिरकाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईतील भूजल उपशाचा परिणाम अभ्यासण्यासाठी पालिकेने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे या संस्थेबरोबर एम-पूर्व आणि पी-दक्षिण या दोन विभागात एक अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे. पालिकेच्या रेन हार्वेस्टिंग कक्षाने कीटकनाशक अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील जुन्या खोदलेल्या विहिरी तसेच विंधण विहिरींची यादी बनवली आहे. विहिरींचे उपलब्ध भूगर्भाचे माहितीच्या आधारे संगणकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील भूजलाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी भूजलाच्या अतिउपशामुळे धोकादायक भूजल परिस्थिती झालेल्या विभागांची नोंद करण्यात येत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
जानेवारी २००३ पासून पालिकेने मुंबईतील अस्तित्वात असलेल्या विहिरी बुजवण्यास मनाई केली आहे. अनधिकृतपणे विहिरी बुजवल्यास इमारत आणि कारखाने विभागाच्या असिस्टंट इंजिनीअरमार्फत एमपीआरटीपी कायदा ५३ (१) अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sea-water-enters-in-mumbai-ground-water/articleshow/55947748.cms
No comments:
Post a Comment