मुंबई महानगर विकास आराखडा अहवाल ठळक मुद्धे

मुंबई महानगर विकास आराखडा अहवाल  ठळक मुद्धे

मित्रानो, 

२०८ पानाचा अहवाल ३-४ तासात अभ्यासाने शक्य नाही व शहर नियोजन तज्ञ नसल्याने माझ्या मर्यादा लक्षात घेता तंतोतंत माहिती देणे शक्य नाही हे मी मान्य करून अहवालात वसईबाबत नमूद  केलेले ठळक मुद्धे पान क्रमांकासहित देण्याचा प्रयत्न करतो. ( अहवालातील सर्व नकाशे काळजीपूर्वक पहा

  • पान ८६ शहरीकरणामुळे वसईतील तलाव प्रदूषित ( वाघोली व निर्मल तलावाच्या स्पष्ट उल्लेख )
  • पान ८७ वसईतील भूजल पातळीत घट, गंभीर धोका शक्य
  • पान १११. सन २०३५ पर्यंत लोकसंख्येबाबत वसई  क्रमांक ५चे महानगर
  • पान ११२ व ११४ वसईतील महानगर पालिकेत समाविष्ट २९ गावासहित उर्वरित २१ गावचाची मुंबई महानगर विकास आराखडात समावेश, २१ गावांची यादी दिलेली आहे.
  • पान ११७ हरित  पट्ट्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औदयोगिक बांधकामास सूट
  • पान १२० जमीन  वापर नकाशा न विसरता बघा व माहिती वाचा
  • पान १२४ गास गावात औद्योगिक विकासासाठी विशेष विकास केंद्र ( गास गावाचा स्पष्ट उल्लेख )
  • पान  १२८ पाली-मुळगाव मार्गे किनारपट्टी मार्ग व मेट्रो . ( शहर व गाव यांच्या मधून जातो)
  • पान १३० झोपडपट्टी व मुंबईतील गरिबांसाठी आपल्या विभागात गृहप्रकल्प
  • पान ७० व १३४ लोकसंख्या वाढीसोबत पाण्याची भीषण टंचाई, तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर
  • पान १३९ समुद्राजवळील गावे  पर्यटन स्थळ.

वाद - विवाद  न करता पुढील धोका लक्षात घेता हरकती नोंदवा. जमल्यास संपूर्ण अहवाल वाचा हि विनंती.

मेकेन्झी डाबरे
कार्यकर्ता - पर्यावरण संवर्धन समीती
भुईगाव


No comments:

Post a Comment